Marriage …मला माझा नवरा आवडत नाही … लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी पत्नी म्हणाली नको मला हा पती … पतीला बसला मोठा धक्का … काय आहे प्रकरण ?

पुणे -प्रतिनिधी

देवाब्राह्मण साक्षीने दिमाखात झालेले लग्न अवघ्या तिसऱ्या दिवशी तुटले. आई-वडिलांच्या दबावात लग्न केल्याचे सांगणाऱ्या पत्नीचे कौटुंबिक न्यायालयाने (family court ) लग्न रद्द ठरवले आहे. न्यायाधीश बी. डी. कदम यांनी हा निर्णय दिला असून, यासाठी ७ महिने १६ दिवस लागले.राकेश (२७ वर्षे, व्यावसायिक) आणि स्मिता (२४ वर्षे, गृहिणी) यांचे जून २०२४ मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न (marriage) झाले. लग्नानंतर पतीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, पण पत्नीने नकार दिला आणि नवरा पसंत नसल्याचे सांगितले. (crime )

तिने निव्वळ आई-वडिलांच्या दबावात लग्न केल्याचे स्पष्ट केले. लग्नाच्या २० दिवसांत ती माहेरी गेली आणि परत आली नाही. पतीला धक्का बसल्याने त्याने वकील राहुल जाधव (adv rahul jadhav) यांच्यामार्फत मे २०२५ मध्ये न्यायालयात दावा दाखल केला.हिंदू विवाह कायद्यात कलम ५ नुसार लग्नासाठी आवश्यक विधी, परंपरा आणि कायदेशीर अटींचे पालन न झाल्यास कलम ११ आणि १२ अंतर्गत लग्न रद्द (cancel) करता येते. असा अर्ज लग्नाच्या तारखेपासून १ वर्षाच्या आत करावा लागतो. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर लग्न रद्द करण्याचा आदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *