Pune sucide : मानसिक छळ , कमी पगार अन बदनामी करण्याच्या संस्थापकाच्या धमकीमुळे तरुणाने गळफास घेत आयुष्य संपवल् .. श्री साई सेवाभावी संस्थासंस्थापकावर गुन्हा दाखल

पुणे -प्रतिनिधी

फुरसूंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे खुले निवारागृहात कर्मचारी न नेमता एकट्या सोशल वर्कर असलेल्या तरुणाकडून संस्थेची व संस्थाचालकांची वैयक्तिक कामे करायला लावून मानसिक त्रास दिल्याने नैराश्यातून सोशल वर्कर असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आपले आयुष्य संपविल्याची घटना 22 जून रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे . या घटनेन परिसरात एकच खळबळ उडाली आहे .(Suicide)

मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव अतुल अंकुश लाळगे (Atul Lalge) (वय २६, रा. श्री साई सेवा भावी संस्था, गंगानगर, फुरसुंगी) असे आहे ,तुल यांचा चुलत भाऊ अनिकेत लहुदास लाळगे (वय २७, रा. वडले, ता. फलटण, जि. सातारा) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
त्यानुसार संस्थाचालक बालाजी मुस्कवाड (Balaji Muskawad) (रा. साई सेवाभावी संस्था, संचलित खुले निवारागृह, सिद्धीविनायक कॉलनी, गंगानगर, फुरसुंगी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार अतुल लाळगे हे गेल्या अडीच वर्षांपासून श्री साई सेवाभावी संस्था येथे सोशल वर्कर म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहिना रु. 15,000 वेतन देण्यात येत होते आणि अनेकदा वेतन वेळेवर मिळत नसे.

संस्थेतील व्यवस्थापनाने संस्थेला (Sr iSai Sevabhavi) लागणाऱ्या कमीतकमी 8 कर्मचाऱ्यांऐवजी फक्त एक स्वयंपाकी व एक पार्ट-टाइम कामगार ठेवून सर्व कामे अतुल कडून करून घेत होते.. त्यात मुलांची देखभाल, संस्थेची प्रशासनिक कागदपत्रे, दुसऱ्या संस्थेचे पत्रव्यवहार, वैयक्तिक कामे व घरगुती कामे यांचा समावेश होता. संस्थाप्रमुख बालाजी मुस्कवाड यांनी सतत अतुल याला मानसिक त्रास दिला; मुलं पळून गेले तरीही त्याला जबाबदार धरले गेले; तसेच त्यांच्या नातेवाईकांची वैयक्तिक कामे करण्यास भाग पाडले.
संस्थेतील सर्व रजिस्टर व माहिती सतत चार महिन्यांच्या अंतराने बदलून देण्यात येत असल्याचे सांगून नोंदी ठेवण्यास अडथळा निर्माण केला गेला. काही दिवसांपूर्वी संस्थेतील “राजन” नावाच्या मुलाचा मृत्यू झाला. अतुलने त्याला वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारांनंतरही तो मुलगा मृत्युमुखी पडला. या घटनेनंतरही संस्थेतील दबाव वाढवला गेला. बालाजी मुस्कवाड यांनी अतुल याला वारंवार धमकी दिल्याचे, त्याला खोटे जबाबदार ठरवून केस करुन त्याचे जीवन बिघडविण्याची धमकी दिल्याचे अतुलने आपल्या कुटुंबाला फोन करून सांगितले होते. अतुलने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून त्यात वरील सर्व कारण व घटनांची सविस्तर नोंद आहे. सदर आत्महत्येच्या बाबतीत तपास सहायक पोलीस निरीक्षक नानासाहेब जाधव करत आहे .

या घटनेचा कसून चौकशी करावी दोषी आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आरोपीला तात्काळ केली जात आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *